बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकाच हेतू

बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकच हेतू - आपल्याला काहीतरी उत्कटतेने वाटत असते, ते इतरांना सांगावे.

.
.

Monday 17 October 2011

'दुरावा'

[ २००५ साली लिहिलेली एक कविता. ]

काय झाले तुज मना, काही तरी बोलना
शब्द पांगले सारे कि कोमेजल्या भावना ||१||

पापण्या या कोरड्या, ओलावा कुठे दिसेना
मना रिते झाले कि शुष्क साऱ्या संवेदना ||२||

अंतरी दाटे क्षोभ, आसवांनी मालवेना
रुतले बाण असे कि भळभळल्या वेदना  ||३||

गुंतलो एकमेकात, आज काही आठवेना
स्नेह, ओलावा, माया कि फसव्या होत्या वल्गना ||४||

एकटी मी या जगी, सल आता मला छळेना
रमवले मीच मजला कि दुरावा नात्यात जाणवेना ||५||

- आरती.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.