बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकाच हेतू

बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकच हेतू - आपल्याला काहीतरी उत्कटतेने वाटत असते, ते इतरांना सांगावे.

.
.

Friday 30 March 2012

' काळचक्र '

०८/०४/२००५
 
येणे कुणाचे, जाणे कुणाचे
का असे बंधहीन असावे  ?
उत्तर शोधत या प्रश्नाचे
जीवन प्रवाही वाहत जावे

माणसे जितकी, तितकी नाती
वेगवेगळी सारीच भासती
भासो जन्माचे, असो क्षणांचे
तुटता हुरहूर तीच लाविती

तुटले जरी, टिकले जरी
खोली नात्यांची बदलत राहते
असली जरी, नसली तरी
गती आयुष्याची तीच राहते

दुःखाचे कढ, मनाची ओढ
पाऊले जरी झाली जड
सुटले जे सोड, नवे ते जोड
चक्र काळाचे हेच सांगते.

- आरती. 
  
      
   

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.