'मटकीची उसळ' मी कधी कुणाला शिकवेल अशी मी कधीच कल्पनाही केली नव्हती. पण आत्ताच वरच्या आजींना शिकवून आले.
आदल्या दिवशी त्या मला सांगून गेल्या होत्या की उद्या २ वाजता करूया. मी त्यांना रात्री मटकी भिजत घालायला आणि सकाळी एकदा पाणी बदलायला सांगितले. त्यांच्याकडे नसणारच असा विचार करून मी जाताना तिखट-मिठाचा डबा आणि एका छोट्या डबित गुळाचा खडा घेऊन गेले. पण आश्चर्य म्हणजे मी त्यांच्या घरात गेले तेंव्हा ओट्यावर सगळी जय्यत तयारी मांडलेली होती. त्यात मिठ, धणेपूड, जिरे, कडीलींब, गरम मसाला, तेल, हळद आणि खडा हिंग या सगळ्या वस्तू होत्या.
आदल्या दिवशी त्या मला सांगून गेल्या होत्या की उद्या २ वाजता करूया. मी त्यांना रात्री मटकी भिजत घालायला आणि सकाळी एकदा पाणी बदलायला सांगितले. त्यांच्याकडे नसणारच असा विचार करून मी जाताना तिखट-मिठाचा डबा आणि एका छोट्या डबित गुळाचा खडा घेऊन गेले. पण आश्चर्य म्हणजे मी त्यांच्या घरात गेले तेंव्हा ओट्यावर सगळी जय्यत तयारी मांडलेली होती. त्यात मिठ, धणेपूड, जिरे, कडीलींब, गरम मसाला, तेल, हळद आणि खडा हिंग या सगळ्या वस्तू होत्या.
स्वयंपाकाची म्हणा किंवा खाण्यापिण्याची, मनापासून आवड असेल तर ती अशी यानात्या प्रकारे दिसतेच.
झाले असे की एक दिवस आजोबा रेवाला घेऊन गेले. जाताना म्हणाले तिला मी जेवायला घालतो एमिलिया बरोबर. आम्ही आज भाताचा एक प्रकार केला आहे. मग १० मिनिटांनी परत आले आणि म्हणाले तुम्ही सगळेच या जेवायला आज आजींनी सगळा शाकाहारी स्वयंपाक केला आहे.
मी मटकीची उसळ केली होती आणि गाजराचा हलवा. ते घेऊन आम्ही जेवायला गेलो. मटकीला त्यांनी 'स्मॉल बिन्स' म्हंटले आणि खूप आवडीने खाल्ले. कसे केले ते पण विचारले. मग त्यांनी केलेला तांदळाचा डोसा कसा मस्त कुरकुरीत झाला पण चवीला थोडा वेगळाच झाला, आजोबांनी केलेले फुलके कसे निट जमलेच नाहीत असे सगळे विषय झाले. त्यांच्याकडे असलेले भारतीय पाककृतींचे पुस्तक त्यांनी मला दाखवले वगैरे वगैरे.
भारतीय पदार्थ आणि त्यात वापरण्यात येणारे घटकपदार्थ याची त्यांना असलेली प्रचंड माहिती बघून मी आश्चर्यचकितच झाले. त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले, एकदा झुरिकमध्ये 'धर्मगुरूंची' कमतरता होती म्हणून भारतातून एकजणांना बोलावण्यात आले. झुरिकला येण्यासाठी त्यांची एक अट होती, 'भारतीय पदार्थ बनवून देणारा स्वयापाकी उपलब्ध करून देण्यात यावा.' त्यावेळी स्वयंपाकाची आवड असलेल्या या आजींनी ती जबाबदारी स्वीकारली होती. आणि काही पाककृतींच्या पुस्तकांच्या मदतीने त्यांनी 'धर्मगुरूंची' मागणी पुर्ण केली होती. त्यावेळी त्यांना भारतीय अन्नपदार्थांची भरपूर माहिती तर मिळालीच पण त्यांना स्वतालाही ती पदार्थांची चव आवडली ती कायमचीच.
'दोस्यात छोटे आणि मोठे तांदूळ वापरलेले असतात' असे काही घोळ त्यांचे होतात पण शोधून वाचून विचारून दोघेही आवडीने भारतीय पदार्थ करून मज्जेत खातात याचे मला खूपच आश्चर्य आणि कौतुक वाटते. :)
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.